महाराष्ट्रात होणार नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती, पहा यादी

Maharashtra New District List : महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 01 मे 1960 रोजी करण्यात आली. सध्या महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे असून आणखी नवीन 22 जिल्ह्यांची आणि 58 तालुक्यांची निर्मिती होणार आहे.

येथे पहा सविस्तर माहिती

नवीन अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील नाशिक, पालघर, अहमदनगर, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, बीड, लातूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची विभागणी करून नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत.

लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी सातत्याने होत असते. महाराष्ट्रात या नवीन जिल्ह्यांची निर्मिती केल्याने राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल तसेच, राज्यातील जे नागरिक जिल्ह्याच्या सीमेच्या भागावर राहायला आहेत अशा नागरिकांना शासकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल.

  • नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार केले जाणार आहेत.
  • पालघर जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे नव्याने तयार केले जाणार आहेत.
  • ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याचा प्लॅन असून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.
  • पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
  • रायगड मधून महाड जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • बीडमधून अंबाजोगाई हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • लातूर मधून उदगीर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी 26 जिल्हे होते मात्र त्यानंतर लोकसंख्या वाढली तसेच क्षेत्रफळाच्यादृष्टीनेही अनेक जिल्हे मोठे असल्याने प्रशासकीय कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालयी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणीजाणे अवघड झाले होते त्यामुळे टप्प्या टप्प्याने 10 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले होते.

राज्यात आजच्या घडीला असे अनेक जिल्हे आहेत जे अनेक किलोमिटर पसरलेले आहेत विशेष करून ग्रामीण भागातजिल्ह्याच्या ठिकाणी जायचे म्हटले की ये-जा करण्यात पूर्ण दिवस घालवावा लागतो म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.शिवाय प्रशासकीय यंत्रणेलाही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

नवीन जिल्ह्यांची निर्मिती आणखी प्रस्तावित आहे.

Leave a Comment